तू भले सांग जगाला !
तू भले सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस
पण मी येईनच फिरून
तुझ्या प्रत्येक कवितेच्या
प्रत्येक ओळीच्याप्रत्येक शब्दातून
आणि करीन तुला अस्वस्थ, उदास,सुन्न, विषण्ण
खात्री आहे मलाजेव्हा होईल
अनावर तुलालपवून ठेवणं
तेव्हा तू करशीलच कबूल कधीतरी दोघांती
की प्रेम कधीतरी केलं होतंस तूही माझ्यावर
मग तू भले सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस
(manogat)
0 Comments:
Post a Comment
<< Home