Sunday, March 05, 2006

किती तरी दिवसात..

किती तरी दिवसात आपली
भेटच झाली नाही
रात्री अपरात्री घोटून
कॉफीच केली नाही

कांदे भजी खाता खाता
गप्पा रचल्या नाही
तुझ्या भावविभोर शब्दात
कविता सजल्या नाही

तार स्वरात वाऱ्यावरती
सूर फेकले नाही
काहितरी करायला पायजे
असे ऐकले नाही

भटाबिटांच्या कवितंची पण
छेड काढली नाही
सगळे मिळून 'अरे वेड्या'
'पत्र' वाचली नाही

किती तरी दिवसात लेका
तुला भेटलो नाही
शहाण्यासारखा वागत गेलो
वेडाच झालो नाही

(tushar joshi, nagpur)

1 Comments:

At 10:49 AM, Blogger hemant_surat said...

आपल्या ओळींनी हा प्रतिसाद दिला

काहीही केले तरी
कामाचा व्याप कमी होत नाही
भेटीची ईछ्छा असूनही भेट होत नाही.
कामाला वहून घेतांना छंद नाहीसे झाले
करीअरमागे धावताना मित्र वीरून गेले
इन्क्रिमेंट, रेझ मागताना, आपलेसे दूर निघून गेले
मोठ्या गोष्टी मिळविअताना, छोटे आनंद निघून गेले
नीट आरशात पाहीले, तेव्हा मला दिसले,
मला कोणी खांबाला बांधले नाहीय,
माझीच खांबवरची पकड ढिली होत नाहीय.

हेमंत पटील - सुरत

 

Post a Comment

<< Home